भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना

 

शासन निर्णय :- शासन निर्णय क्र. दवसू – 2015/प्र.क्र. 347/अजाक/दिनांक 09 मार्च 2018

योजनेचे स्वरूप

  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील अनुसुचीत जाती व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी सदर योजना शासन निर्णय क्र. दवसु 2015/प्र. क्र. 347/ अजाक मंत्रालय मुंबई दिनांक. 09 मार्च 2018 अन्वये सन 2018-19 या आर्थिक वर्षापासून योजना सुरु करण्यात आलेली आहे.
  • मा. लोकप्रतीनिधिनी सुचविलेली कामे संबंधित लोकप्रतिनिधी ज्या कार्यालयीन यंत्रणेकडून कार्यान्वित करावयाची आहेत त्या कार्यान्वित यंत्रणेचे नाव तसेच यंत्रणेची तत्वत: मंजुरी अंदाजित किमतीच्या कामांचे सविस्तर नकाशे व अंदाजपत्रके संबंधितानी सादर केल्यानुसार मा.जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात येतात.
  • अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील वस्ती सुधार योजनेतर्गत निधी प्राप्त होऊनही पुरेशा निधीअभावी गावातील/वस्त्यांमध्ये विकास कामे पुरेशा प्रमाणात झालेली नाहीत अशा भागातील लोकप्रतिनिधीना त्यांनी मागणी केल्याप्रमाणे ग्रामविकास, अल्पसंख्याक आणि नगर विकास विभागाच्या धर्तीवर शासन स्तरावरुन थेट निधी उपलब्ध करुन देण्याची राज्यस्तर योजना आहे.
  • या योजनेकरीत लोकप्रतिनिधी म्हणून केवळ विद्यमान खासदार व आमदार यांच्याच प्रस्तावाचा विचार होईल

योजनेअंतर्गत घ्यावयाची कामे

  • सदर योजनेतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीतील/ गावातील आणि पुरवठा, मलनि:सारण, पोहोच रस्ते, अंतर्गत रस्ते, गटार बांधणे, स्मशान भूमीचा विकास करणे, पथदिवे, पर्जन्य पाण्याची निचरा,सार्वजनिक सुलभ शौचालये, ग्रंथालय/ अभ्यासिका, व्यायाम शाळा या व्यतिरिक्त स्थानिक वस्तीतील रहिवाशांच्या गरजा लक्षात घेता विकास कामांना समावेश शासन स्तरावरुन करण्यात येईल.